दोन मुली झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

0
654

भोसरी, दि. २० (पीसीबी) – दोन मुली झाल्याच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासूने विवाहितेचा छळ केला. ही घटना एक ऑगस्ट 2009 ते 18 सप्टेंबर 2021 या कालावधीत आळंदी रोड भोसरी येथे घडली.

पती सागर मालोजीराव ताटे (वय 35, रा. आळंदी रोड, भोसरी), सासू (वय 50) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने रविवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेला दोन मुली झाल्या या कारणावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासूने तिचा छळ केला. विवाहितेच्या लग्नामध्ये तिच्या वडिलांनी हुंडा दिला नाही. घरामध्ये विवाहितेला नीट काम जमत नाही या कारणावरून देखील तिला त्रास दिला.

विवाहितेच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिने हिस्सा घेतला नाही म्हणून पती आणि सासूने घरामध्ये किराणा माल न भरता तिच्या मुलींची उपासमार केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.