दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

0
858

पालघर, दि. ११ (पीसीबी) – दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात पालघर जिल्ह्यातील वरई-सफाळे मार्गावरील तांदुळवाडी घाटात बुधवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास झाला.

अक्षय भरत पाटील (वय २५, रा. गिराळे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या दुचाकीने गिराळे येथील त्याच्या घरी निघाला होता. तांदुळवाडी घाटातील नागमोडी वळणावर अक्षयच्या बाईकला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यामुळे अक्षय बाजूने जाणाऱ्या बसवर आदळला. यामध्ये अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.