देशाला खडड्यातून काढण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना रनौट

0
359

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाला बॉलिवूड क्वीन, प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौटने उघडपणे पाठिंबा दिला आहे. ‘देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष पुरेसे नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. तेच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत,’ असे मत कंगनाने व्यक्त केले आहे. मात्र राजकारणात प्रवेश करण्याबाबतच्या प्रश्नावर तिने सूचक मौन पाळले.