देशात पुन्हा पोलिओचा धोका, महाराष्ट्रात हायअलर्ट

0
847

नवी दिल्ली, दि.२९ (पीसीबी) – भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी यास सुरुंग लागण्याची शक्यता आहे. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिओ व्हायरस आढळल्याने देशावर पुन्हा पोलिओ संकट कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बायोमेड कंपनीच्या या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वापरण्यात आल्याचे समोर आले असून दोन्ही राज्यांना अलर्ट केले असल्याची माहीती देण्यात आली आहे.