देशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांइतकेच उद्योगपतींचेही योगदान – पंतप्रधान मोदी

0
1023

लखनऊ, दि. २९ (पीसीबी) – देशाच्या प्रगतीमध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. तसेच उद्योगपतींचेही आहे. त्यामुळे त्यांनाही तितकाच सन्मान मिळायला हवा, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले.  

मोदी लखनऊच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. लखनऊ येथे विविध योजनांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मोदी म्हणाले की,  देशाच्या जडणघडणीत ज्या प्रकारे शेतकरी, बँका, कामगार, मजूर, सरकारी कर्मचारी यांची महत्वाची भुमिका असते तितकीच महत्वाची भुमिका उद्योगपतींचीही असते. उद्योगपतींना चोर-लुटारी असल्याची भाषा वापरली जाते, त्यांच्याबाबत असे बोलणे ही कुठली चांगली पद्धत आहे.

महात्मा गांधींचे जीवन इतके पवित्र होते की, त्यांना बिर्लाच्या कुटुंबासोबत राहण्यात संकोच वाटला नाही. कारण त्यांची वृत्ती स्वच्छ होती. मात्र, आत्ताच्या नेत्यांना जनतेसमोर उद्योगपतींना भेटायला आवडत नाही. मात्र, त्यांना पडद्यामागून सर्व करायला आवडते,  असा टोलाही  मोदींनी विरोधकांना लगावला.