Notifications

देशाचे सर्वात मोठे दुर्दैव; आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार-राहूल गांधी

By PCB Author

September 24, 2018

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव हे आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र चोरांचे सरदार आहेत अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. राफेल करारासंदर्भातला एक व्हिडिओच त्यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये रिलायन्सला या करारातून मोदींनी कसा फायदा करून दिला हे दाखवण्यात आले आहे. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी केलेला दावा पुढे आणत त्यांनीही आपल्या देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हटल्याचे म्हटले होते. त्याआधीही देश का चौकीदार चोर है म्हणत त्यांनी टीकेचे ताशेरे झाडले होते. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत म्हणत त्यांनी टीकेची तोफ डागली आहे. यावर आता भाजपा नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.