देशाचे तुकडे करणाऱ्यांना तुरुंगात टाकू – अमित शहा

0
316

सांगली, दि. १० (पीसीबी) – मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कलम  ३७० रद्द करण्याला विरोध केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिव्या द्यायच्या असतील, तर आम्हाला द्याव्यात. मात्र, देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा आम्ही देशाचे तुकडे करणाऱ्यांना तुरुंगात टाकू, अशा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.

सांगलीच्या जतमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी शहा यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर तोफ डागली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी १० वर्षांत राज्यासाठी काय केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंधरा वर्षांत महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय केले? तुमच्या ५५ वर्षांच्या कामांपेक्षा आम्ही पाच वर्षांत केलेली कामे अधिक आहेत, असा दावाही  यावेळी शहा यांनी केला.