Maharashtra

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रालाच फायदा होईल – एकनाथ खडसे

By PCB Author

February 06, 2020

नवी दिल्ली,दि.६(पीसीबी) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री म्हणून जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावरच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, दिल्लीमध्ये येणं किंवा न येणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर नाही. वरिष्ठांनी ठरवलं तर ते दिल्लीला जाऊ शकतात पण जर ते दिल्लीला गेले तर त्याचा महाराष्ट्राला फायदाच आहे.

दिल्ली विधानसभेसाठी येत्या ८ तारखेला मतदान होणार आहे. दिल्लीच्या प्रचारासाठी भाजपच्या मदतीला महाराष्ट्रातल्या प्रमुख भाजप नेते गेले आहेत. खडसे देखील दिल्लीला प्रचाराला गेले आहेत.