मुंबई, दि. ९ (पीसीबी) – पुढचा मुख्यमंत्री मीच राहणार, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा हा त्यांचा वैचारिक दुष्काळ असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी ट्विटरवर हे व्यंगचित्र पोस्ट करत सत्ताधारी भाजपाला फटकारले.