दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा  

0
606

पर्थ, दि. १८ (पीसीबी) – दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी भारताचा दारूण पराभव केला. या विजयामुळे  मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५ बळी घेण्याची आवश्यकता होती.  सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या  ५ फलंदाजांना तंबूत पाठवून सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने ३-३ गडी बाद केले. या  सामन्यात ८  बळी  घेणाऱ्या लॉयनला सामनावीरचा किताब देण्यात आला.