पर्थ, दि. १८ (पीसीबी) – दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी भारताचा दारूण पराभव केला. या विजयामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५ बळी घेण्याची आवश्यकता होती. सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या ५ फलंदाजांना तंबूत पाठवून सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने ३-३ गडी बाद केले. या सामन्यात ८ बळी घेणाऱ्या लॉयनला सामनावीरचा किताब देण्यात आला.