Maharashtra

दुष्काळ असताना स्वागत कसले करता; शरद पवारांनी गावकऱ्यांना खडसावले

By PCB Author

May 13, 2019

अहमदनगर, दि. १३ (पीसीबी) – दुष्काळी दौऱ्यावर असताना स्वागत करणाऱ्या गावकऱ्यांवर  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खडसावले. दुष्काळ असताना स्वागत कसले करता, असे पवार गावकऱ्यांवर दटावले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर शरद पवार यांनी राज्याच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात केली आहे.  आज (सोमवार) ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवारही सोबत  आहेत.

यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावर पवार म्हणाले की, दुष्काळ असताना स्वागत कसले करता, अशी दटावणी केली. यानंतर पवारांनी गावकऱ्यांची गाऱ्हाणे ऐकून घेतले. दुष्काळी कामांचा आढावा घेतला. उपाय योजनाबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली.