Notifications

दुष्काळाकडे लक्ष देण्यासाठी कुंभकर्णाला जागं करणार – उध्दव ठाकरे   

By PCB Author

December 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राज्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळ झपाट्याने हातपाय पसरत आहे. त्यामुळे कोणत्या विभागात काय कामे करायला पाहिजे, यासाठी आम्ही आढावा घेतला आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका  घेतली आहे.  त्यामुळे झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी २४ तारखेला पंढरपूरला सभा घेणार आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) येथे सांगितले.