मुंबई, दि. ९ (पीसीबी) – प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. दुकानात एखादी जरी प्लास्टिकची पिशवी आढळून आल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुकानाला टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज (मंगळवार) दिली.