दिल्ली राजकारणात अमित शहा देखील नवे आहे, पण आम्ही कधी म्हटलं का नया हैं वह? – संजय राऊत

0
414

मुंबई,दि.१४(पीसीबी) – “राजकारणात येणारा प्रत्येक माणुस नवीनच असतो. दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे आहे. पण आम्ही कधी म्हटलं का नया हैं वह….?? असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर केलं होत तसंच ‘नया है वह’ म्हणत आदित्य यांची खिल्ली उडवली. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

“मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात ते सुद्धा नवे होते. मात्र हे जरी दिल्लीच्या राजकारणात नवीन असले तरी कलम 370 हटवण्यासारखा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आमच्याकडे चांगल्याला चांगलंच म्हटलं जात. आम्हाला शिकवण आहे तशी…राजकारणात येणारा प्रत्येक माणुस नवीनच असतो. दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे आहे. पण आम्ही कधी म्हटलं का नया हैं वह….?? ” अशा शब्दात फडणवीसांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, आदित्य यांचं कौतुक करताना संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे तरूण आहेत. तडफदार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अगदी झोकून देऊन काम करत आहेत. वरळी कोळीवाडा त्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रणाखाली आला. तसंच त्यांची टीम कोरोनाच्या काळात चांगलं काम करत आहे.”