दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीमार; तणावग्रस्त परिस्थिती   

0
401

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. मात्र,  दिल्ली- उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली आहे. यावेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असून शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.