दिल्लीत जाऊन ‘त्या’अधिकाऱ्याच्या कानाखाली मारणार – बच्चू कडू

0
482

मुंबई, दि. (पीसीबी) – ज्या कोणी केंद्रातील अधिकाऱ्यांने दुष्काळाची नवी नियमावली तयार केली आहे. दिल्लीत  जाऊन त्या अधिकाऱ्याच्या कानाखाली  मारणार आहे , असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.  राज्यात भीषण दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यात सरकारी पातळीवर काहीच हालचाली होताना दिसत नाही. तर अधिकारी मात्र, दुष्काळाची नियमावली तयार करण्यात गुंग आहेत. यावर कडू यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.