Banner News

दिल्लीच्या आंदोलकांना चीन व पाकीस्तानकडून रसद ; 300 रूपये देऊन भाड्याने आणले आंदोलक – पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर केशव घोळवे यांचा धक्कादायक आरोप

By PCB Author

December 08, 2020

पिंपरी, दि.8 (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत उप महापौर केशव घोळवे यानी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी अंदोलना बाबत अत्यंत गंभीर आरोप केला. दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे ते मँनेज केलेले आहे. ते म्हणाले, या आंदोलनातील आंदोलक भाडेकरु आहेत, त्यांना रोज ३०० रुपये भाड्याने आणलेले आहे. आंदोलनाला चीन व पाकीस्तानकडून रसद पुरविली जात आहे काय ? अशी शंका आहे. शेतकरी आंदोलनाची घोळवे यानी खिल्ली उडवली. दरम्यान, राष्ट्रवादी ने घोळवे यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

या सभेच्या सुरवातीलाच जाचक शेतकरी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सभा तहकूबीची सुचना मांडली त्यास  शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर नगरसेविका मंगला कदम यांनीही सभा तहकूब करा अन्यथा मतदान घ्या असे सुचविले. त्यावर उत्तर देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी  दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे ते मँनेज केलेले आहे. या आंदोलनामध्ये आंदोलक भाडेकरु आहेत, त्यांना रोज ३०० रुपये भाड्याने आणलेले आहे. तसेच या आंदोलनास चीन व पाकीस्तानकडून रसद पुरविली जात आहे काय? अशी शंका व्यक्त करुन शेतकरी आंदोलनाची थट्टा उडविली.

याबाबत महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी निवेदन काढून निषेध व्यक्त केला आहे.  मिसाळ यांनी या निवेदनात म्हटले आहे की, वस्तुत: सदर दिल्लीतील शेतक-यांचे आंदोलन गेली १० -१२ दिवसापासून चालू असून या आंदोलनामध्ये पंजाब,बिहार व हरीयाणाचे शेतकरी स्वत: वाहने घेऊन दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. हळूहळू संपूर्ण देशात या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. त्याचाच परीपाक म्हणून आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे. असे असताना सुध्दा  उपमहापौर केशव घोळवे यांनी या शेतकरी आंदोलनास भाड्याचे लोक आणले म्हणून तसेच या आंदोलनास पाकीस्तान व चीनकडून रसद मिळत आहे काय ?  असे उदगार शेतकरी आंदोलनाबाबत भरसभे मध्ये काढून शेतक-यांची थट्टा उडविली. सदरची बाब अतिशय निंदनीय असुन देशातील तमाम शेतक-यांचा अपमान करणारी आहे. त्यामुळॆ उपमहापौर केशव घोळवे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जाहीर निषेध करते तसेच त्यांनी तमाम शेतकरी बांधवांची माफी मागावी अशी आग्रही मागणी केली आहे.