दारू पोहचवण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा; उध्दव ठाकरेंचा सरकारला टोला

0
383

मुंबई, दि. १५ (पीसीबी) –  घरपोच दारूच्या बाटल्या पोहचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहचवा, अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला फटकारले आहे.  घरपोच ऑनलाइन दारू पोहचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक आहे. ऑनलाइन दारू देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. मात्र राज्याची ‘शोभा’ करण्याचा प्रयोग रोजच सुरु आहे, अशी टीका   उद्धव ठाकरे  यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकातून केली आहे.