Maharashtra

दहशतवादाला धर्म नसतो; त्याला ठेचलाच पाहिजे- राज ठाकरे

By PCB Author

May 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याला हिंदू, मुस्लीम अशी लेबल लावण्याची गरज नाही. एकदा कळले की तो दहशतवादी आहे की त्याचा ठेचलेच पाहिजे अशी रोखठोक आणि आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. दहशतवादाला हिंदू, मुस्लीम अशी लेबल जोडायची आणि माथी भडकवत रहायची हे सुरू आहे जे गैर आहे. दहशतवाद्याला ठेचलेच पाहिजे. त्याला धर्म नसतो असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले गेले, बोस्टनमध्ये एक स्फोट घडवण्यात आला. या स्फोटाला जे जबाबदार होते त्यांना दीड दिवसात अटक झाली. ट्विन टॉवर पाडण्याचा कट रचणाऱ्यालाही ठार करण्यात आले. याला म्हणतात कृती किंवा दहशतवादाविरोधात उचलेले ठोस पाऊल. या दोन घटना सोडल्या तर अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला नाही. दहशतवादाला उत्तर अशा प्रकारे द्यायचे असते असे उदाहरणही राज ठाकरेंनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला जी स्वप्न दाखवली जी आश्वासने दिली. त्यातले एकही पाळले नाही. नरेंद्र मोदी त्याबद्दल आता बोलतही नाहीत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचेही समर्थन पंतप्रधान कशा काय करू शकतात असेही राज ठाकरेंनी विचारले आहे. दरम्यान १७ मे रोजी ठाण्यात शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विकण्यासाठी मोर्चा निघणार आहे. या मोर्चासंदर्भात राज ठाकरेंनी एक आवाहनही केले आहे.