Maharashtra

‘त्या’ दिवशी अजित पवारांनी राजीनामा देल्याने फोकसच बदलला – छगन भुजबळ

By PCB Author

October 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते, त्यादिवशी इतके वातावरण तयार झाले असताना अजित पवार यांनी राजीनामा देण्याची काही गरज नव्हती. त्यांनी दोन दिवस आपल्या भावना आवरायला हव्या होत्या, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या त्या राजीनाम्याची अजिबात गरज नव्हती. तो राजीनामा दोन दिवसांनी दिला असता तरी चालले असते. त्या दिवशी प्रचंड आग पेटली होती. ईडीचा शरद पवारांवर हल्ला म्हणत सर्व फोकस शरद पवारांवर होता. वातावरण प्रचंड पेटले होते. दोन दिवस तरी सर्व मीडिया व्यापला असता. पण संध्याकाळ होत आली आणि सगळा फोकसच बदलला,  अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

याच्यात पक्षाचा काय फायदा झाला, काय नुकसान झाले, हे त्याच त्याने ठरवावे, असे म्हणत राजीनामा देण्याचे काही कारण नव्हते. कशासाठी राजीनामा दिला ? निदान त्यादिवशी द्यायला नाही हवा होता. निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे वातावरण निर्माण झाले होते, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.