मनमाड, दि. २३ (पीसीबी) – सनातन सारख्या संस्थांवर वेळीच कारवाई करून २००५ मध्येच या संस्थांवर बंदी घालण्याची सुचना केली होती. त्यावेळी माझे ऐकले असते तर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कुलबर्गी यांच्या हत्या झाल्या नसत्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (गुरूवार) येथे केला.