“त्याला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो; मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं”

0
870

मुंबई,दि.८(पीसीबी) – त्याला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो, मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं, असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

एका सिव्हील इंजिनिअरला मारहण केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर होत आहे. त्यावरून कालपासून बरीच चर्चा सुरू आहे. मात्र आज आव्हाडांनी मारहाण प्रकरणावर मौन सोडलं आहे.

आव्हाड म्हणाले, खरं तर त्याला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो. मी मारहाण झालेल्या ठिकाणी नव्हतो. गेल्या २५ तासांपासून मी माझ्या मतदारसंघात आणि सोलापूरमधला आढावा घेण्यात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं.

दरम्यान हा अभियंता गेल्या तीन वर्षांपासून माझ्या विरोधात नको त्या पोस्ट करत असतो. माझ्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट माझ्या अनेकदा लक्षात आणून दिली. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. खरं तर तो केव्हाच गजाआड जायला हवा होता. पण मीच त्याकडे दुर्लक्ष केलं, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.