Maharashtra

….त्यामुळे सरकारची फसवणुकीची मालिका सुरुच – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

By PCB Author

February 24, 2020

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत येताना त्यांनी याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या मात्र, अद्याप त्यांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे सरकारची फसवणुकीची मालिका सुरुच आहे. याबाबत सभागृहात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना २५ हजार ते ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असे सरकारने सांगितले होते. मात्र, यातील एक नवा पैसा अद्याप त्यांना मिळालेला नाही. त्याचबरोबर कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लावू असंही या सरकारने सांगितले होते. तसेच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु, त्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, यांपैकी एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असून ही फसवणुकीची मालिका अद्याप सुरु आहे.