…त्यामुळे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं आणि कायम बसावं लागेल – संजय राऊत

0
458

मुंबई,दि.२१(पीसीबी) – ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलं नाही. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं आणि कायम बसावं लागेल, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून कार्यक्षमता आम्ही सांगलीच्या महापुरात पाहिली. भीमा कोरेगाव दंगलीतही त्यांची कार्यक्षमता पाहिली. तेव्हा महाराष्ट्र जळत होता. त्यात मला फार बोलायला लावू नका. सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची स्तुती करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.