Maharashtra

“त्यांना पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही हीच खंत”

By PCB Author

September 20, 2020

मुंबई,दि.२०(पीसीबी) – देवेंद्र फडणवीस यांना पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही हीच खंत आहे असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

युती केली ही चूक झाली. युती नसती तर भाजपच्या 150 प्लस जागा आल्या असत्या, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावरून सामंत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान उदय सामंत यांनी यावेळी बोलताना नाणार प्रकल्पाबाबतही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे.