‘तो’ घोटळा दाबण्यासाठी राधाकृष्ण विखेंना मंत्रिपद; अजित पवारांचा आरोप

0
491

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुंबईच्या विकास आराखड्यातील (डीपी) घोटाळ्याची आणखी माहिती पुढे येऊ नये, यासाठीच भाजपने राधाकृष्ण विखे-पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या  पत्रकार परिषद पवार बोलत होते.

राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मुंबईच्या विकास आराखड्यातील घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवला होता. मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता भाजपला मिळाला आहे.

हे बदल रद्द न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विखे-पाटील यांनी दिला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने राधाकृष्ण विखे- पाटील यांना मंत्रिपद दिल्याचा आरोप पवारांनी  यावेळी केला आहे.