“ते ज्या पक्षात जात आहेत त्याच पक्षाने त्यांचा छळ केला”

0
224

जालना,दि.२१(पीसीबी) – एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं. एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. विशेष म्हणजे भाजपपेक्षा हे त्यांच्यासाठी जास्त दुर्दैवं आहे. ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप केले, त्या पक्षानेच त्यांच्यावर ही पाळी आणली. ते ज्या पक्षात जात आहेत त्याच पक्षाने त्यांचा छळ केला आहे. त्यांनी त्याच पक्षात जाणं ही दुर्दैवाची बाब आहे”, असं मत रावसाहेब दानवे यांनी मांडलं आहे.

दरम्यान “नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाचे चांगले नेते होते. या पक्षातच त्यांची जडणघडण झाली. या पक्षाने त्यांना ओळख दिली. त्यांना मंत्री केलं, त्यांच्या सूनेला आमदार केलं. एकनाथ खडसे यांना विविध पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिली”, असं दानवे म्हणाले.