Maharashtra

तेव्हाच ईडी-बिडी सगळे शांत झाले; शरद पवारांचा खुलासा

By PCB Author

October 13, 2019

लातूर, दि. १३ (पीसीबी) – दिल्लीच्या तख्तावरून सत्ताधारी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्यावेळी हा शिवरायांचा महाराष्ट्र असून हा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्ताला नमणार नाही, असे जेंव्हा आम्ही ठणकावून सांगितले, तेव्हाच ईडी-बिडी सगळे शांत झाले असा  दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केला आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय बनसोडे आणि अहमदपूर मतदार संघाचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.

दरम्यान, शरद पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.  त्यानंतर तुम्ही स्वत: येण्याची गरज नाही, असा  ईमेल ईडीने केला होता.  या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी ईडी का शांत झाली ?   ईडीने केलेल्या कारवाईवरून  निर्माण झालेल्या परिस्थितीवर मोठा खुलासा केला आहे.