तुम्ही कांदा खात नसल्या तरी अर्थव्यवस्था नक्कीच खाल्लीय’; सीतारमन यांच्यावर सामान्य जनता संतापली

0
536

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) – ससंदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी कांद्याच्या दरवाढीवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचे उत्पादन का घटले आणि त्याबद्दल काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारला. देशभरात कांद्याच्या किंमतीनं शंभरी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना सीतारमन यांनी “मी अशा कुटुंबातून आहे जिथे जास्त कांदा आणि लसूण खाल्ला जात नाही,” असे अजब स्पष्टीकरण दिले. सितारमन यांच्या या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.