तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला घ्यावे लागेल – उद्धव ठाकरे

0
406

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राम मंदिर नाही, तर भविष्यात हे सरकार राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा अयोध्येत जाऊन देणाऱ्या शिवसेनेने या मुद्द्यावरून पुन्हा केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. मंदिर बांधण्यासाठी लागणारी हिंमत नसल्यानं काँग्रेसला जनतेने धूळ चारली आणि हिंमतवान छप्पन इंचवाल्यांच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या. पण त्यांना सर्वत्र काँग्रेसच दिसत असेल तर, तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला घ्यावे लागेल, असा घणाघात शिवसेनेने केला.