तुमच्या उमेदवाराला दोन वेळा हरवून निवडून आलो आहे; चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला  

0
493

पंढरपूर, दि. ११ (पीसीबी) – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मी शरद पवारांच्याच उमेदवाराला दोन वेळा हरवून पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो आहे, हे पवार विसरतात, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

मागच्या दाराने येणाऱ्यांनी एकदातरी लोकांतून निवडून यावे, अशी खोचक टिप्पणी  शरद पवार यांच्याकडून वारंवार पाटील यांच्याविषयी  होत असते. पाटील यांनी उत्तर दिले आहे.

पाटील म्हणाले की, पदवीधर निवडणूक ही देखील निवडणूक असते. यासाठी ५ जिल्हे ५८ विधानसभा आणि १० लोकसभेचे कार्यक्षेत्र असते,  हे शरद पवार विसरले आहेत काय, असे पाटील यांनी  म्हटले आहे. पक्षाने आदेश दिल्यास आपण विधानसभाच काय लोकसभा देखील लढवू, असेही पाटील म्हणाले.

पवारांकडून होत असलेली टीका ही २३ मे जवळ येऊ लागल्याने होत आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीसह सर्व १० जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास व्यक्त करून पवारांना याचा अंदाज आल्यानेच बारामती हरली तर  इव्हीएम मशीनमुळे हरेल, ही भाषा  त्यांनी सुरु केली आहे, असे पाटील म्हणाले.