मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सुरू असलेला जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. नंदूरबार, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन लोकसभा मतदारसंघावरून जागा वाटपाचे घोडे अडले आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपाची बोलणी अद्यापही सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १५ जानेवारीला दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून, या तीनही मतदारसंघाबाबत पुन्हा चर्चा होणार आहे.