तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी  

0
462

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. हा अध्यादेश सहा महिन्यांपर्यंत लागू असेल.  त्यामुळे केंद्र सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करावे लागणार आहे. तर दुसरीकडे तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक राज्यसभेत मंजूर करुन घेण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही.