तिहेरी तलाकच्या समर्थनार्थ हायकोर्टात याचिका; येत्या शुक्रवारी सुनावणी होणार  

0
467

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हा अध्यादेश बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. मुंबईतील माजी नगरसेवक मसूर अन्सारी आणि सामाजिक संस्था रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन यांच्यातर्फे वकील देवेंद्र मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.