तिसऱ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर २०३ धावांनी विजय

0
784

लंडन, दि. २२ (पीसीबी) –  इंग्लंडच्या विरूध्दच्या तिसऱ्या कसोटी  सामन्यात भारताने पाचव्या दिवशी इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला. या  विजयामुळे भारताने या मालिकेत आपल्या विजयाचे खाते खोलले आहे. तर इंग्लंड  २-१ ने आघाडीवर आहे. इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने ४ गडी गमावले. त्यानंतर बटलर-स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव  सावरला.