तिघेही एकत्र अंगावर आले, निवडणूक लढले तरी भाजप त्यांना पुरून उरेल – देवेंद्र फडणवीस

0
550

मुंबई,दि.१७(पीसीबी) – भाजप तीनही पक्षांना एकटय़ानेही पुरून उरेल, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घेऊन जनादेश मिळवावा, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलं आहे. तसं झाल्यास भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्ती केला आहे.

फडणवीस यांनी, तसेच हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. एकमेकांमधील विसंवादातून ते पडेल. ते तिघेही एकत्र अंगावर आले किंवा निवडणूक लढले, तरी भाजप त्यांना पुरून उरेल, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला राम मंदिर उभारण्याची घोषणा करून ट्रस्ट स्थापन केली आहे. काही जण अयोध्येला जाणार असल्याचं सांगत आहेत. त्यांनी अयोध्येला जरूर जावं. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांचे स्मरण होईल, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.