…तर भाजपाने महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी दिली असती – ओवैसी

0
371

औरंगाबाद, दि. २० (पीसीबी) – भाजपाने भोपाळमधून बॉम्बस्फोट आणि दहशतवादासारखे गंभीर आरोप असलेल्या महिलेला तिकीट दिले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊन भाजपाला धर्मयुद्ध छेडायचे आहे. बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून मुस्लिमांनी हा प्रकार विसरु नये. महात्मा गांधी यांना मारणारे कोण होते, त्यापैकी कोणी आज जिवंत असते तर त्यालाही साध्वी प्रज्ञासिंहप्रमाणे भाजपाने तिकीट दिले असते, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.