…तर बिहारमध्ये मुंबईतून मुद्दे पार्सल होऊ शकतात – संजय राऊत

0
160

मुंबई,दि.२७(पीसीबी) – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नाव न घेता टोला लगावला आहे. बिहारच्या निवडणुका विकास तसेच कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर लढल्या जाव्यात. मात्र, हे सगळे मुद्दे संपले असतील तर बिहारमध्ये मुंबईतून मुद्दे पार्सल होऊ शकतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

सुशांतसिंह राजपूत हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असावा, यासाठीच मुंबईत इतके राजकारण केले. बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे. कामाचे, विकासाचे मुद्दे नसल्याने मुंबईतले मुद्दे प्रचारात आणले जात असल्याचेही राऊत म्हणाले.

दरम्यान बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीवरूनही राऊत यांनी टीका केली आहे. हत्या आणि आत्महत्यांवरून तपास सुरू झाला. आता हा तपास कुठपर्यंत गेला आहे ते पहा, असे राऊत म्हणाले. बिहारमधला कोविड-१९ संपूर्णपणे संपल्याशिवाय निवडणुका कशा लढल्या जाणार आहेत, तसेच बिहार निवडणुकांसाठी सरकारने नेमकी काय उपाययोजना केली, असा सवालही त्यांनी विचारला.