…तर नितीश कुमार भाजपाची साथ सोडून स्वबळावर लढतील निवडणूक

0
822

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जागा वाटपा संदर्भात मित्र पक्षांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये भाजपाने घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरु केली आहे. बिहारमध्ये भाजपाने जितक्या जागांवर दावा केलाय त्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून मतभेदांची दरी रुंदावण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी भाजपाला निम्म्या म्हणजे २० जागा हव्या आहेत.