लातूर, दि. २३ (पीसीबी) – राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात विलंब होत आहे. यावर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उपग्रहाद्वारे मॅपिंग करून दुष्काळ जाहीर करणार असाल, तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका, असा टोला त्यांनी लगावला.