…तर तलवारीने माणसे का मारु शकत नाही ? जावेद मियाँदाद बरळला

0
493

इस्लामाबाद, दि. ५ (पीसीबी) – काश्मीरी बांधवांनो तुम्ही  चिंता करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.  मी फलंदाजी करताना षटकार मारू शकतो,  तर या तलवारीने माणसे का  मारु शकत नाही ? अशी वल्गना पाकिस्तानचा  माजी खेळाडू  व फलंदाज जावेद मियाँदाद यांनी केली आहे.

मियाँदाद यांनी म्यानातून तलवार काढून अशा प्रकारचे चिथावणीखोर विधान केले आहे. या विधानाचा   व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर पाकिस्तानाचा तिळपापड झाला आहे. आता मियाँदाद बरळला आहे.

दरम्यान,  भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावग्रस्त परिस्थितीवर भाष्य करणारे मियाँदाद हे काही पहिलेच क्रिकेटपटू नाहीत. यापूर्वी शाहीद आफ्रिदी यानेही ट्विट करत या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली होती. तर, मियाँदाद यांनी भारताला अण्वस्त्र वापरुन बेचिराख करु, असे बेताल वक्तव्य केले होते.