…तर चंद्रकांत पाटलांविरोधात मैदानात उतरू – राजू शेट्टी

0
287

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील,  तर त्यांच्या विरोधात  मैदानात उतरू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  तसेच सत्तेच्या गैरवापराची शिकवणी भाजपकडे लावावी, अशी टीकाही त्यांनी केली.  

औरंगाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर पत्रकारांशी शेट्टी  बोलत होते. पीक विमा कंपन्यांनी सरकारची तिजोरी लुटली. स्वत: मुख्यमंत्र्यांना पीक विम्याचे घोटाळे दाखवून दिले. मात्र, कंपन्यांना जाब विचारण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, अशी टीकाही  त्यांनी केली.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीकविम्याची रक्कम द्यावी, दुष्काळामुळे वाळलेल्या पिकांचे पंचनामे करून एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे या वेळी करण्यात आली.  महापोर्टल बंद करावे, पोलिस भरती करण्यात यावी, मेगी भरती करण्यात यावी, अशी मागणी करत राज्य सरकारने बेरोजगार युवकांना गृहीत धरणे सोडावे, हा ज्वालामुखी आहे तो केव्हाही फुटेल, असा इशारा  पाटील यांनी यावेळी दिला.