….तर ‘कायद्याचे राज्य’ कोसळल्याशिवाय राहणार नाही; सरन्यायाधीशाचा इशारा

0
582

पुणे, दि. ८ (पीसीबी) – ‘आपण लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहत आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण सजग राहिले पाहिजे. आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. ही संकल्पना कोसळली तर ‘कायद्याचे राज्य’ कोसळल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी दिला.