…तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या २७७ जागा निवडून येतील – अमोल मिटकरी

0
652

बल्लारपूर , दि. १० (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली. तर सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या केवळ ११ जागा निवडून  येतील.  आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या  २७७  जागा निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे.

शिवस्वराज्य यात्रा  बल्लारपूर येथे  दाखल झाली होती. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी सरकारवर जोरदार  प्रहार केला. ते म्हणाले की,  शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही, मात्र रशियाला हजारो कोटींचे कर्ज देण्याची ताकद कोठून येते?  तसेच पक्षाची निष्ठा सोडली की लोकांना ढोलकी वाजवण्याची वेळ आली आहे. जे पक्षाशी निष्ठावंत आहेत आणि जे संकटाच्या काळात साथ सोडत नाहीत तेच इतिहास घडवतात.

भारताचे चांद्रयान सफल झाले नाही, म्हणून पंतप्रधान मोदी रडले. पण मोदी रडले ते केवळ ३७० नंतरचा मुद्दा गेला याकरिता. भिडे गुरुजी सांगतात एकादशीला यान उडवले असता सफल झाले असते. पण सरकार गड-किल्ले भाड्याने देण्याचे जाहीर करत आहेत, यावर काहीच बोलत नाहीत,  अशी टीका मिटकरी यांनी यावेळी केली.