….तर आम्हाला लोकांना जबरदस्ती घरी बसवावे लागेल तुकाराम मुंढेंचा इशारा

0
851
नाशिक दि. २१ (पीसीबी) –  नागरिकांनी बाहेर पडणे कमी केले नाही तर आम्हाला लोकांना जबरदस्ती घरी बसवावे लागेल,” असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
“नागरिकांनी लॉक डाऊनचा समजून घेतला पाहिजे. सर्वांनी आपल्या घरात राहावे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ नये हा यामागचा उद्देश आहे. सरकारने नागरिकांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे,” असे मुंढे यावेळी म्हणाले.
“नागरिकांसाठी प्रशासनातील लोक रस्त्यावरही उतरले आहे. असे करतानाही लोकं आदेश पाळत नाहीत. याचा दुष्परीणाम आपल्यावरच होणार आहे. वेळेतच सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी कालपासून शहरात नियम लागू करण्यात आले आहेत. आम्ही अपील करून, जागोजागी जाऊन लोकांना हे सांगत आहोत. सर्व करूनही लोकांना कळत नसेल तर जबरदस्ती लोकांना घरी बसवायला लागेल,” असेही त्यांनी नमूद केले. आम्हाला असे करण्यास भाग पाडू नये अशी विनंतीही त्यांनी केली.
“कृपया कोणीही घराबाहेर पडू नये. नागरिकांनी इतरांनाही हे आवाहन करावे. करोनाला आळा घालण्यासाठी हे आवश्यक आहे. आम्ही अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. आम्ही पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष देऊन आहोत. संपूर्ण परिस्थितीचा आढावाही घेत आहोत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण ती नियंत्रणाबाहेर जाऊ द्यायची नाही. आम्हाला साथ द्या. पोलिसांचे पेट्रोलिंगही वाढवण्यात आले आहे, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.