Maharashtra

…तरच महाशिवआघाडीत सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ- राजू शेट्टी

By PCB Author

November 18, 2019

मुंबई,दि.१८ (पीसीबी)- महाशिवआघाडीचा किमान समान कार्यक्रम जर आम्हाला योग्य वाटला तरच आम्ही या नव्या आघाडीत सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

आम्ही संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे घटक आहोतच. मात्र, सध्या भाजपला बाजूला करून जी महाआघाडी निर्माण होऊ पाहते आहे. यातील किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्याचा मुद्दा वरच्या पातळीवर आणि प्रमुख रहावा, अशी आमची भूमिका आहे.

निवडणुकीच्या कालवधीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासंन दिलेलं आहे. हा मुद्दा देखील किमान समान कार्यक्रमात आला पाहिजे असा आमचा आग्रह आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तिन्ही पक्षांनी बनवलेला किमान समान कार्यक्रम जर आम्हाला योग्य वाटला तरच आम्ही आघाडीसोबत जाण्याबाबत निर्णय घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.