Maharashtra

तक्रार करणारे भाजपच्या वाटेवर; संजय निरूपम गटाचा आरोप    

By PCB Author

September 17, 2018

 मुंबई, दि. १७ (पीसीबी) – मुंबई  काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून त्यांच्या जागी  मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्याची मागणी निरूपम विरोधी गटाने काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. मात्र, तक्रार  करणारेच भाजपच्या वाटेवर आहेत, असा आरोप निरुपम गटाने केला आहे.

आमदार असलम शेख, माजी मंत्री सुरेश शेट्टी, जावेद खान,  महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह अनेक नेते आणि काँग्रेसच्या मुंबईतील नगरसेवकांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन  तक्रारी करणारे नेतेच भाजपच्या वाटेवर आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी माहिती त्यांना दिल्याचे निरुपम गटातील नेत्यांनी सांगितले.

संजय निरुपम हे एकमेव असे  नेते आहेत की जे काँग्रेसचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरतात, सरकारविरोधी आंदोलनात ते पुढे असतात. त्यांनी मुंबईमध्ये काँग्रेस  संघटनेला बळ दिले आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन खर्गे यांना दिल्याचे सांगितले जात आहे. यावर  आता काँग्रेस हायकमांड कोणते भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.