डोंगरीमध्ये घडलेली दुर्घटना नसून हत्याचं – वारीस पठाण

0
434

मुंबई, दि,१६ (पीसीबी) – मुंबईमध्ये आज (दि,१६) डोंगरी भागातील कौसरबाग चार मजली इमार कोसळ्याने १२ जणांचा मुत्यृ झाला आहे. ही दुर्घटना नसून एक हत्या आहे एमआयएम आ. वारीस पठाण यांनी सरकारला जबाबदार आरोप केला आहे.

वारीस पठाण म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून मी धोकादायक इमारतींवर आवाज उठवत आहे. अनेकदा विधानसभेतही त्यावर आवाज उठवला. सरकारने केवळ आश्वासन दिले, पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आज घडलेली घटना ही दुर्घटना नसून हत्याच आहे, असा खळबळजनक आरोप वारिस पठाण यांनी केला आहे.