Notifications

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री

By PCB Author

October 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – “इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. तसेच गीता, बायबल आणि कुराणपेक्षा आम्हाला संविधान प्रिय आहे, असेही ते म्हणाले.