Maharashtra

डीवायएसपी भाग्यश्री नवटकेंना तुरूंगात टाका; अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ – बाबुराव पोटभरे

By PCB Author

December 04, 2018

बीड, दि. ४ (पीसीबी) – माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांची बदली करू नको, तर त्यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची रवानगी तुरूंगामध्ये करा, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. तर येत्या ८ दिवसात नवटकेंवर गुन्हा दाखल  नाही केल्यास  उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाग्यश्री नवटके यांची एक वादग्रस्त क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये अॅट्रॉसिटीची तक्रार घेऊन आलेल्या दलितांना आपण कशी मारहाण करतो, हे सांगितल्याचे दिसत आहे.  क्लीप व्हायरल झाल्यानंतर भाग्यश्री नवटके यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाने त्यांनी औरंगाबादला बदली केली आहे.

दरम्यान, नवटके यांची बदली करून चालणार नाही, तर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, तसेच नवटके यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात टाका,अशी मागणी पोटभरे यांनी केली आहे.